सोलापूर

टेंभुर्णीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरु

टेंभुर्णी  :  टेंभुर्णी शहरासाठी पाणीपुरवठा योजना उजनी धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्यामुळे फक्त एक दिवस पुरेल एवढेच पाणी जॅकवेल जवळ आहे.यामुळे अडचणीत आली असून.यापासून टेंभुर्णी करांना पाणीटंचाई पासून वाचवण्यासाठी
दुबार पंपिंग  (उचल पाणी ) करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न चालू आहेत.
 सोलापूरला शहराला  पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीपात्रातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरण बॅक वॉटरवर अवलंबून असलेल्या सर्वच गावच्या  पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या असून यामध्ये टेंभुर्णी पाणीपुरवठा योजना ही अडचणीत  आली आहे.पाणी उचलण्याच्या पाईपाच्या लांब खाली गेले आहे.
यामुळे पाणी पंचायतीच्या मोटारीच्या पाईपा पर्यंत पाणी पोहोचणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये दुबार पंपिंग करून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त एक दिवस पुरेल एवढेच पाणी जॅकवेल जवळ आहे. टेंभुर्णी सरपंच सुरजाताई बोबडे जिल्हा नियोजन समीतीचे  सदस्य योगेश बोबडे यांनी बॅकवॉटरच्या शहराला पाणीपुरवठा करणा-या विहिराला भेट देऊन उचलपाणी करण्यासाठीच्या सर्व सुचना केल्या.तर कर्मचा-यांनीही  प्रयत्नाची परकाष्टा करून शेवटच्या पाईप वरील गाळ काढून घेत पाणीपुरवठा तात्पुरता सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे.यावेळी सरपंच प्रतिनिधी योगेश बोबडे,उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवशे,ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे,सोमनाथ ताबे व रामभाऊ शिंदे उपस्थित होते.
टेंभुर्णी शहराला पाणीपुरवठा करणा-या उजनी धरणाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट होऊन पाणीसाठा कमी झाला आहे.व आणखीन कमी होणार आहे.तरी शहरातील प्रत्येक नागरिकांनी टंचाईच्या काळात पाणी जपून वापरण्याचे अहवान ग्रामपंचायत प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button