महाराष्ट्रसोलापूर

शिवसेनेच्या ‘होऊ दे चर्चा’ अभियानाला अक्कलकोट शहर व तालुक्यात उदंड प्रतिसाद*

केंद्रात खोटी आश्वासने देऊन सर्व जनतेची दिशाभूल करत फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारचे अपयश घराघरापर्यंत पोहचवा, असे आवाहन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजिलेल्या ‘ होऊ दे चर्चा ‘ या राज्यस्तरीय आभियाना अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील शहरी  भागात अक्कलकोट भाजपच्या मध्यवरती कार्यालय समोर  मल्लिकार्जुन मंदिर प्रांगण येथे होऊ दे चर्चा रथाचे उद्घघाटन अनिल कोकीळ यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
अनिल कोकीळ म्हणाले जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आल्यावर मात्र गेल्या नऊ वर्षात भाजपने जनतेची मोठी फसवणूक केली असल्याचे जनतेने सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ व तालुका  प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या समोर संतप्त भावना व्यक्त केले जनतेमध्ये भाजप बद्दल प्रंचड चिड निर्माण झाल्याचे दिसुन आले.
महागाई,बेरोजगारी, शेतकरीयांचे प्रश्न, स्मार्ट सिटीचे भोगस कामे, इंधन दरवाढ व इतर मूलभूत प्रश्नांवरील सरकारचे अपयश शिवसैनिकांनी घरोघरी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहन केले.
 हे कार्यक्रम तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली खाली अक्कलकोट विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग, सोलापूर जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख सुनील कटारे महिला जिल्हाप्रमुख प्रियाताई बसवंती, जिल्हा उपप्रमुख अक्कलकोट शहर प्रमुख सिद्धाराम गुब्याड  सोपान निकते, शहर संघटक सचिन जकापूरे, समन्वयक श्रीशैल पाटील, शहर उपप्रमुख श्रीकांत शेडम, गंगाराम धोत्रे, शरण सूरवसे, गुरनिगप्पा पाटील, उमेश साळुंखे, आयाज जमादार, अफसर मकानदार, हणमंत नागुरे, परमेश्वर ठोबंरे मुरगेंद्र मुडनकेरी, बसवराज पूजारी, मल्लिनाथ अरवतकल, श्रीशैल स्वामी, राजकुमार गोणापुरे व इतर सर्व तालुक्यातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button