महाराष्ट्र

उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची उडाली तारंभळ.

टेंभुर्णी  :
 उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागल्याने नदी काठावरील शेतकरी पाइप केबल व विद्युत पंप काढण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. यावर्षी उजनी पाणी पातळी मोठ्या प्रमाणात आहे. खालावल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फेब्रुवारीपासून जादा पाइप टाकून पाणी उचलावे लागत होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे उजनीचा पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
जूनमध्ये वजा ५९.९९ टक्के जलसाठा असलेले धरण आता शुक्रवारी मृत साठ्यातून बाहेर येणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची उचल पद्धतीने पाणी घेण्यासाठी होत असलेली दमछाक थांबली आहे. गतवर्षी पावसाळा संपताना उजनी धरणाची पाणीपातळी अधिक ६०.६६ टक्के होती. सोलापूर शहराला पिण्यासाठी नदीतून सोडलेले पाणी, कालव्यातून सोडलेले तापमानामुळे झालेले मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन यामुळे घट झालेले होती. त्यामुळे पुणे, अहमदनगरसह सोलापूर जिल्ह्यातील माढा व करमाळा तालुक्यातील धरण काठावरील उजनी, आढेगाव, अकोले, फुटजवळगाव, कंदर, बिटरगाव, कविटगाव शेलगाव,सांगवी, वांगी, दहिगाव आदी गावातील शेतकऱ्यांना जादा पाइप टाकून पाणी उचलून पिके जगवावी लागली होती. मूळ पाइपलाइन तीन ते चार हजार फूट वाढवावी लागली होती. यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले.
दुष्काळामुळे उजनीतील उचल पद्धतीने पाणी घेण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली होती. जुलै महिन्यापासून धरणात येणाऱ्या पाण्यात चांगली वाढ झाली आहे. ४ जून ते २६ जुलैपर्यंत धरणात २७ टीएमसी जलसाठा झाला आहे. त्यामुळे आता शेतकरी आपल्या विद्युतपंप, केबल, पाइप आदी सामान काढून ठेवत आहेत. काहींनी विद्युतपंप मूळ जागेवर बसवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button