उजनीचा विसर्ग घटला जलाशयात29 हजार क्युसेक्स ने पाणी येते वाटचाल 50% कडे सुरू

पुणे जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसात झालेल्या पावसामुळे मुळा ,मुठा, पवना, इंद्रायणी नद्यातून आलेल्या पाण्यामुळे उजनीच्या वरील 19 पैकी 16 धरणे शंभर टक्के भरली व खाली दौंड कडे भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढत गेला व एक ऑक्टोबर पर्यंत उजनी जलाशयात 38 टक्के पाणीसाठा तयार झाला . 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 39 हजार 895 क्युसेक्स असणारा विसर्ग सायंकाळ पर्यंत 29हजार 850 क्युसेक्स झालेला असून सध्या उजनी जलाशयात याच विसर्गाने पाणी येत आहे व येणाऱ्या विसर्गात घट निर्माण झाली आहे .धरणामध्ये 87 टीएमसी पाणी साठा तयार झाला असून टक्केवारी 45.26 % आहे,व यापुढे उजनीची वाटचाल 50% कडे सुरू आहे .
दरम्यान 2 ऑक्टोबर पासून सीना माढा व दहिगाव सिंचन योजनेतून खरीप पावर्तन सुरू झाले असून, नागरिक व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून करकंब वॉटर स्टोरेज टॅंक व आष्टी तलाव भरुन घेण्यासाठी 3 ऑक्टोबर पासून उजनी कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून वृत्त आहे, उजनी धरण 100 टक्के भरण्यासाठी पुणे जिल्ह्यातील परिसरात आणखीन मोठ्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे हे नक्की.