महाराष्ट्र
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, उजनी ओव्हर फ्लो, भीमेला आला पुर.

टेंभुर्णी : उजनी धरणात येणारा दौंड व बंडगार्डन मधून विसर्ग पाहता उजनी धरण ओव्हर फ्लो झाले असून भीमा नदीला पूर आला आहे उजनी वर अवलंबून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण सध्या ऊस लागवडीचा हंगाम चालू असून सर्व शेतकऱ्यांचे डोळे उजनी धरणाकडे लागले होते गेल्या वर्षी उजनी धरण प्लस 63% भरले होते पाण्याचे नियोजन झाले नसल्यामुळे उजनी लवकरच मायनस मध्ये पोचली होतै यावर्षी मात्र पाण्याची योग्य नियोजन व्हावे असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे कारण गेल्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी सलग दोन महिने पाणी राहिल्याने कडक उन्हाळ्यामध्ये जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली होती शेतकऱ्यांच्या विहिरी,बोर. काही तासावर येऊन ठेपल्या होत्या त्यामुळे या वर्षी तरी उजनी धरणाच्या पाण्याची योग्य नियोजन व्हावे.
उजनीतून नदीत 126 621 क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे निरा नरसिंहपुर संगम येते 3,19000 हजार चा विसर्ग झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून काही शेतकऱ्यांचे ऊस पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे. सध्या भीमा नदीच्या पुलाजवळ पर्यटकांची रीघ लागलेली दिसत आहे गेली दहा ते पंधरा वर्षापूर्वी भीमा नदीला असाच पूर आला होता. त्यावेळीही पर्यटकांनी याचा भरपूर आनंद घेतला.आज ही तीच परिस्थिती असल्याने शेवरे,भिमानगर, या ठिकाणी पूर पाहण्यासाठी लोकांची रीघ लागलेली दिसत आहे.