महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या वाहनांना टोल फी माफ करावी

मोहोळ(̲तालुका प्रतिनिधी)̲ : पेनूर टोल प्लाझा वरती पेनूर व परिसरातील सर्व प्रकारच्या वाहनांना टोल फी माफ करावी यासाठी पेनूर ग्रामस्थांच्या वतीने टोल प्लाझा व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले.

 पेनुर व परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी टोल प्लाझाच्या पलीकडे असल्यामुळे शेतकऱ्यांना सतत आपल्या शेतात ये -जा करावी लागते, तसेच दुग्ध व्यवसाय वाहतूक करणे, शेतीची मालवाहतूक करणे तसेच पेट्रोल पंपा वरती पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी येणे -जाणे सतत करावे लागत आहे त्यामुळे पेनूर गावातील नागरिकांना टोल भरणे अशक्य आहे,
 त्यामुळे पेनुर व परिसरातील नागरिकांना टोल फी माफ करावी यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आला व तो ठराव आणि निवेदन टोल प्लाझा व्यवस्थापकास देण्यात आले आणि जर का टोल फी माफ केली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला*̲ यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश मालक कस्तुरे रणजीत चवरे, रामदास चवरे, माजी सरपंच रमेश माने, सज्जन चवरे, सर्जेराव दाजी चवरे, दिग्विजय माने, विठ्ठल माने, सज्जु शेख , अभिजीत गवळी, तानाजी सावंत, सज्जन माने,शिवसागर गायकवाड, महेश चवरे, लक्ष्मण चवरे, तानाजी भोसले, रामहरी चवरे, मारुती चवरे, पैलवान अर्जुन चवरे, व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button