मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आ.अमित देशमुख यांच्या नांवाची घोषणा आघाडी सह कॉग्रेस करेल का ?

शिव निर्णय/सोलापूर : लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने पक्षाच्या व आघाडीच्यावतीने विभागवार आढावा बैठका, मिटींग, मेळावे चालू आहेत. परंतू युतीचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा अजंठा आहे तसा आघाडीच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
राज्यात आघाडीमधे मुख्यमंत्री होण्याबाबत स्पर्धा लागली असुन तीच परिस्थीती युतीमधे ही होवू शकते. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला दावा करित असले तरी सिनियर म्हणून अजित पवार ही मुख्यमंत्री होण्यास इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे पुन्हा येणार असे म्हटले नसले तरी त्यांची इच्छा असणार आहे. तर आघाडी मधे बैठकावर बैठका चालू असुन कॉग्रेसच्या माद्यमातून शांततेचे प्रतिक असलेले संयमी नेतृत्व म्हणून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नावावर शिक्का मोर्तब होवू शकतो. अथवा त्यांच्या नांवाची घोषणा कॉग्रेस श्रेष्ठीनी करावी असे चित्र लातून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या लागलेल्या निकालावरून लपून राहिले नाही. लातूरच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्रवर स्व.विलासराव देशमुख यांची पकड मोठी होती आणि ती अजुन अस्तित्वात आहे. स्व.विलासराव देशमुख यांच्या नंतर त्यांच बंधू दिलीपराव देशमुख, अमित देशमुख व धिरज देशमुख यांनी देशमुख साहेबांचा परिवार संपर्कात ठेवला आहे. लोकसभेने महाराष्ट्रात काँग्रेसचा झंजावात निर्माण केला. विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला मोठे यश मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाने यश मिळवले. त्यामुळे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यावर लातूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी देणे आवश्यक असुन त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना समोर आणावे त्याचा फायदा लातूरच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्र व कॉग्रेस आघाडीला होवू शकतो. भाजपाला सत्तेचा अहंकार होता. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने त्यांचा अहंकार उतरवला. राज्यातील महायुतीचे सरकार आहे. राज्यातील सरकार जाणार असल्याचे भाकित अनेक तज्ञ बोलून दाखवित आहेत आघाडीचे नेतृत्व मा.शरदचंद्र पवार, मा.उध्दव ठाकरे व कॉग्रेसचे नाना पोटोले करित असले तरी मुख्यमंत्री पदासाठी एकमत होताना दिसून येत नाही परंतू या पदासाठी वाद ही नाही अथवा त्यांचे ठरले ही असेल ज्या पक्षाचे आमदार जास्त येतील त्या पक्षाकडे मुख्यमंत्री होईल असा निकष असल्याचे समजते. परंतू निवडणूकी नंतरची समिकरणे झाली असतील परंतू निवडणूकी अगोदर विकासरत्न विलासराव देशमुख यांचे चिरंजीव माजी मंत्री अमित देशमुख यांचे नांवाची कॉग्रेसच्या नेत्यांनी घोषणा केल्यास राज्यातील समिकरणामधे मोठा बदल होवू शकतो. काँग्रेस पक्षाचे नेते विलासराव देशमुख आज आपल्यात नाहीत. परंतू, त्यांची आजवरची भाषणे, त्यांच्या परिवाराची कॉग्रेस बरोबर असलेली निष्ठा, वेळोवेळी काँग्रेसचा प्रचार, दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्चाखाली अमित देशमुख व धिरज देशमुख यांनी लोकसभेत कॉग्रेस पक्षाला व आघाडीला मोठे यश मिळवून दिले आहे.
लोकसभेत १०० टक्के निकाल देणारे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी अता राज्यातील आघाडीचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आ.अमित देशमुख यांच्या नांवाची घोषणा आघाडी सह कॉग्रेस करेल का ? अशी आपेक्षा राज्यातील युवा वर्गात दिसून येत आहे.