महाराष्ट्र
बिजवडी येथील वचनपुर्ती सोहळ्यात बोलतानाआ.जयकुमार गोरे…विधानसभा निवडणूक लढणार नाही!

आ.जयकुमार गोरे:बिजवडीत वचनपुर्ती सोहळा संपन्न
बिजवडी ता.माण येथे जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता मिळाल्याने माणमधील बिजवडीसह २१ गावांचा १.१ टीएमसी पाणी देण्याच्या वचनपूर्ती बद्दल बिजवडीत २१ गावांच्या वतीने आ.जयकुमार गोरे यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी अरुण गोरे,अर्जुन काळे,दादासाहेब काळे,हरीभाऊ जगदाळे,अक्षयमहाराज भोसले,सिध्दार्थ गुंडगे यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होते.
यावेळी आमदार गोरे म्हणाले की,आजचा कृतज्ञता सोहळा देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी आहे.माझ्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवायचे आहे.ज्या गावात पाणी देणे शक्य आहे त्या गावात पाणी देणार.९७ गावात उसाची शेती होत आहे.माझ्या पहिल्या निवडणुकीपासून जो शब्द दिला तो पूर्णत्वास होत आहे.तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता त्या तालुक्यात चार साखर कारखाने उभे राहिले.आमदार कोण आहे हे महत्त्वाचे नाही तर आमदार म्हणून लोकांसाठी काय केले हे महत्त्वाचे आहे.
ज्या शरद पवारांवर माण खटाव तालुक्याने जिवापाड प्रेम केले,खासदार केले.परंतु या तालुक्याला दुष्काळी ठेवण्याचे पाप त्यांनी केले.रामराजेंनी आमच्या हक्काचे धोम-बलकवडीचे पाणी फलटणला पळवले.२० वर्षे जलसंपदामंत्री असताना या भागाला ते पाणी देऊ शकले नाहीत.आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष होता येते,लवासातून पैसा खाता येतोय.पण आमच्या माण खटावला पाणी का देता येत नाही.मग त्यावर मी का बोलू नये.स्वातंत्र्यापासून आजपर्यंत शरद पवारांसह अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले.परंतु एकाही मुख्यमंत्र्यानी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.परंतु देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले होते.दुर्दैवाने सरकार गेले आणि महाविकास आघाडीला ते टिकवता आले नाही.
पण माण खटावला दुष्काळमुक्त करायचे आहे.२०१९ मध्ये आंधळी धरणातून उचलून या भागाला पाणी देणार हा शब्द दिला होता.या योजनेचे भूमिपूजन करून हे कामही सुरू करून दाखवले २१ गावांचे काम चालू केल्याशिवाय येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नाही,असा संकल्प आ.जयकुमार गोरे यांनी केला.