प्रयत्न करणारे प्रामाणिक असतात तेव्हा अशा प्रकारचे वस्तीगृह उभे राहतात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खेड : सामाजिक भान ठेवून समाजभावी संस्था काम करतात.शिक्षण आणि सुविधा मध्ये महाराष्ट्र पुढे आहे.प्रयत्न करणारे प्रामाणिक असतात तेव्हा अशा प्रकारचे वस्तीगृह उभे राहतात असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुलुंड येथील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांनी बांधलेले कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत,खासदार सुनिल तटकरे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भुषण बरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या लोकापर्ण सोहळासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर मुंबई या ठिकाणी वरुन लाखो कुणबी बांधव उपस्थित होते.वसतिगृह उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्य, प्रतिनिधी मंडळ सदस्य, सर्व तालुका विभागीय शाखा पदाधिकारी कुणबी युवा मंडळ, महिला मंडळ, राजकीय संघटन समिती बळीराज सेना पदाधिकारी यांनी खूप परिश्रम घेतल्याने कुणबी समाज बांधवांची प्रचंड उपस्थिती लाभली. छत्रपती संभाजी मैदान मुलुंड येथे संपुर्ण मुंबई सह संपूर्ण कोकणातून जनसागर लोटला. संपूर्ण मैदान भरून गेले होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.शिंदे म्हणाले की,या वस्तीगृहासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्याचे सर्वाचे अभिनंदन करतो.आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये जेवढा वाटा सरकारचा तेवढाच वाटा आपल्या सारख्या सेवाभावी संस्थाचा सुध्दा आहे.हि संस्था शिक्षण,रोजगार,उद्योग यासाठी पाठबळ देत आहे. ओबीसी बांधवान स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग करायचा आहे त्यांचा व्याज परतावा सरकार भरणार हा निर्णय घेतला आहे.72 वस्तीगृहा पैकी 52 वस्तीगृह याच महिन्यात चालू होत आहेत.परेलच्या वास्तूला जो निधी पाहिजे तो देखील देण्याचे आश्वासन श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.ओबीसी बांधवानसाठी 10 लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.मराठा समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे.रत्नागिरी जिल्हामध्ये तालुका तेथे कुणबी भवन बांधण्यात येणार आहे.असे ही यावेळी श्री.शिंदे यांनी सांगितले.
कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई या आपल्या मातृसंस्थेला १०३ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. शतक महोत्सवानंतर प्रथमच समाजाच्या शिरपेचात आपल्या विद्यार्थ्यांसाठी व आपल्या सगळ्यांच्या अभिमानाच एक भव्य दिव्य असं वसतिगृह उभारण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून मुंबई शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची राहण्याचा प्रश्न मिटला आहे. राहण्याची सोय नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना देशाची आर्थिक राजधानी मध्ये शिक्षण घेता येत नव्हते.अनेक अडचणीवर मात करुन हे वस्तीगृह उभे राहीले आहे.
इमारतीची रचना – सर्व्हे क्रं – १२१-१२३, ९० फिट रोड मुलुंड (पूर्व) येथे हे वस्तीगृह बाधण्यात आलेअसून ,तळ मजला पार्किंग,पहिला मजला देखभाल खर्चासाठी भाडे तत्वावर देण्यासाठी गाळे आहेत.दुसरा मजला कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांचे कार्यालय व कँटिंग आहे.तिसरा मजला- प्रशस्त हॉल,चौथा,पाचवा,आणि सहाव्या मजल्यावर एक वेळेत १५० विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आहे.