रायगड

पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा सुखावला 

तळा – तळा तालुक्यात सध्या पावसाने  विश्रांती घेतल्याने बळीराजा सुखावला आहे.  संततधार पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून पडत होता. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी भिती शेतकरी वर्गाला होती .तरीही काही भागात भातशेतीचे नुकसान ही झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
सुरवातीला पावसाने सुरुवात केल्यानंतर चांगला पाऊस पडला त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन लावणी चांगल्या पध्दतीने झाली तदनंतर  मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन.वरकस कडेकपारीतील जमिनींची लावणीही चांगली झाली तर काही भागात पावसाने नुकसानही झाले असले तरी आता दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने भात शेतीची वाढ चांगली होऊन पिक चांगले येईल अशी आशा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.नाचणीचीही लागवड यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी केल्याने नाचणीचे पिक मागील वर्षापेक्षा चांगले येईल अशी अपेक्षा आहे.पावसाने चांगली साथ दिली तर यावेळचा खरीप हंगाम शेतकरी वर्गासाठी चांगला राहील असेही शेतकरीवर्ग बोलत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button