महाराष्ट्र

जागतिक प्राणी दिन

सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे  परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून  दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी (सर्व प्रकारच्या ) प्राणीमात्रांना क्रूरपणे  वागवले जाते  त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो..                             काही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो तर काहींना दिवसभरात खायलाही मिळत नाही ही समस्या सोडविण्यासाठी विविध कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. लहान मोठ्या, पाळीव भटक्या अशा सर्व प्राणीमात्रांचा यामध्ये समावेश होतो.
खरे तर माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री जुनीच आहे, परंतु हे संबंध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागले आहेत. जंगलातील प्राण्यांचा चोरटा व्यापार, प्राण्यांवर प्रयोग करणे, त्यांना खाणेपिणे न देगे, कमी जागेत किंवा सतत बांधून ठेवणे, त्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याकडून नको तितके काम करून घेणे, जिवंत प्राण्याचेही अवयव काढणे, प्राण्यांपासून विविध वस्तू बनविणे, झुंज लावून एकाचा जीव जाईपर्यंत ती चालवणे, जिवंत प्राणी खाणे वा प्राण्यांचा छळ करत असतात या मुक्या पशुपक्ष्यांची भाषाही आपल्याला समजत नसल्याने त्यांच्या सम स्वांत भरच पडते. याविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर सामुदायिक आवाज उठवण्याचे आणि काही कृती करण्याचे महत्व वर्ल्ड अॅनिमल डे ला सांगितले जाते. या निमित्ताने आपण प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तू (हस्तदंती मूर्ती, कातडी वा पसेंस इ.) खरेदी न करण्याचे ठरवून पशुपक्ष्यांना मिळणा-या क्रूर वागणुकीस अटकाव करावा. जीवसृष्टीत मानवाप्रमाणेच इतर प्राण्यांचे अस्तित्वसुद्धा महत्त्वाचे आहे. बदलत्या हवामानाचा मानवाप्रमाणेच पर्यावरणातील प्राणी प्रजा-
तीचरसुद्धा विपरीत परिणाम होत आहे. परिणामी आज प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर झाले.  प्राज्यांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक प्राणी दिवस साजरा केला जातो. १९३९ मध्ये इटलीतील फ्लोरेन्स या ठिकाणी पर्यावरण शास्त्रज्ञांची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पृथ्वीवरील धोक्यात आलेल्या प्राणी प्रजाती आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. तेव्हापासून ४ ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने प्राणी आणि त्यांच्यावर प्रेम करणायांचा सन्मान केला जातो. प्राण्यांच्या कल्याणार्थं आज जगभरातील विविध संघटना, संस्था प्रयत्नरत आहेत. या संस्था, संघटनांम ध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी या दिनानिमित्त विविधांमुळे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
आज जगभरात प्राण्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी विविध संग्रहालये, संस्था कार्यरत आहेत. आपल्या दे शातसुद्धा भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (झेडएसआय) ही संस्था प्राप्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवते. भारतात १७ व्या दशकाच्या अखेरीस प्राण्यांच्या सर्व क्षणाला सुरुवात झाल्याच्या नोंदी आढळतात. सर विल्यम जोन्स या इंग्रज अधिकार्याला प्राण्यांविषयी प्रेम होते. त्यामुळे १५ जानेवारी १७८४ मध्ये त्याने भारतात एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. त्यानंतर भारतात प्राणी, पक्षी, वनस्पती आदींच्या नोंदी ठेवणे, त्याचे अवशेष गोळा करणे हे काम सुरू झाले.
१८व्या शतकाच्या सुरुवातीला प्राम्यांच्या बर्यापैकी नोंदी आणि अवशेष जमा झाले होते. जमा झालेल्या प्राण्यांच्या नोंदी आणि अवशेषांचे जतन करण्यासाठी १८१४ मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेचे रूपांतर संग्रहालयामध्ये झाले. या संग्रहालयाचे पहिले अधीक्षक नॅथेनिअल बलिद यांच्या नेतृत्वाखाली प्राण्यांविषयीच्या अभ्यासाला आणखीनच वेग आला. १८७५ मध्ये या संग्रहालयाचे रूपांतर भारतीय संग्रहालयात अधिक विस्तार झाला.
अश्मयुगीन काळापासून मानव आणि प्राणी या दोहोंमध्ये मैत्रीचे नाते आहे. काळानुरूप मानवाच्या राहणीमानात बदल होत गेला. मानव सुसंस्कृत झाला, पण मानव आणि प्राण्यांमधील मैत्रीचे नाते अबाधित राहिले, पण मागील काही वर्षांपासून मानव आणि प्राण्यांमधील मैत्रीचे नाते ताणले गेल्याचे पहायला मिळते. मानवाकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्राण्यांचा छळ सुरू आहे. मानवाच्या काँक्रीटच्या जंगलामुळे प्राण्यांचा अधिवास असलेले जंगल नामशेष होत आहे. परिणामी पृथ्वीवरील रानटी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे पहायला मिळते. आज विविध विकासकाम विविधांमुळे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. त्यामुळे बिबट्या, कोल्हा, वाघ यांसारखे जंगली प्राणी आज मानवी वस्तीत आढळतात. या परिस्थितीला संपूर्णपणे मानवच जबाबदार ठरतो. मानवाच्या विकासाच्या अजेंड्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व नकळतपणे धोक्यात आले आहे. प्राण्यांचा छळ केला जातो. यामध्ये पूर्वापारपासून चालत आलेल्या परंपरा कारणीभूत ठरतात. प्राण्यांच्या शर्यती लावणे, सर्कशीत प्राण्यांना चाबकाच्या तालावर नाचवणे, प्राण्यांना घरात कोंडून ठेवणे यांसारखे प्रकार प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. प्राण्यांची कातडी, नखं, दात यासाठी आज मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार केली जाते.
हे रोखण्यासाठी आज विविध कायदे अस्तित्वात असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्राण्यांचे धोक्यात आलेले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उपाय करणे गरजेचे आहे. कारण मानवाप्रमाणेच पृथ्वीवरील इतर प्राण्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. सध्या निसर्गचक्र पूर्ण होण्यासाठी प्राणी मात्रांचे अस्तित्व टिकवून ठेवणं गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button