ग्रामीण भारत देश सुधारण्याकरिता पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यावर भर : कैलास गोरे पाटील

शिवनेरी / मुंबई : ग्रामीण भारत देश सुधारण्याकरिता पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यासाठी जम्मू काश्मीर दौरा आयोजित करण्यात आला होता.दौऱ्याचे उद्दिष्ट जम्मू काश्मीर मध्ये तीन वर्षांपूर्वी पंचायत राज व्यवस्था संपूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेली आहे .
तेथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य आणि प्रशासन यांना मार्गदर्शन करण्याकरिता राष्ट्रीय कोर कमिटी यांचा तीन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला होता. प्रामुख्याने या दौऱ्यासाठी संघटनेच्या राष्ट्रीय महिला व अध्यक्ष श्रीमती सरिता गाखरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री जयमंगल जाधव उपस्थित होते .
जम्मू काश्मीर प्रदेश अध्यक्ष महान सिंह यांनी व त्यांच्या सर्व डीडीसी चेअरमन यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. जम्मूतील पंचायत भवन येथे केंद्रीय कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.प्रदेश अध्यक्ष कर्नल महान सिंग यांनी तेथील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना भेडसावणाऱ्या आव्हानावर प्रकाश टाकला.जम्मू कश्मीर येथील धारा कलम 370 हटवण्यात आल्यानंतर अशा प्रकारची बैठकीचे आयोजन प्रथमच करण्यात आले होते. प्रामुख्याने या बैठकीमध्ये कलम 370 हटवण्यात आल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनचा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला.या प्रदेशातील जिल्हा परिषद सदस्य व तालुका पंचायत सदस्य यांच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याचा पुरावा म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत राज व्यवस्था बळकट करण्याचा कसून प्रयत्न तेथील सर्व सदस्यांच्या माध्यमातून होत आहे .
जम्मू काश्मीरचे गव्हर्नर मा. मनोज सिंह यांचे सर्व अध्यक्ष आणि त्यांच्या सदस्यांनी आभार मानले.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी संघटनेचे ध्येय अधोरेखित करताना देशभरातील सर्व राजकीय पक्षांमधील सर्व पंचायत राज व्यवस्थे मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी एकत्र राहून काम करावे.एकमेकांना सहयोग आणि सामूहिक कृतीची भावना वाढवणे. देशातील पंचायतराज व्यवस्था सशक्त करण्याचे महत्त्व आधारित केले .आणि जम्मू काश्मीर सह उत्तर भारतातील पंजाब आणि हिमाचल प्रदेश येथे देखील जिल्हा परिषद सदस्यांच्या मेळाव्यास संबोधन केले.विशेषता जम्मू काश्मीर येथील अधिकारी वर्गांना नवनिर्वाचित जिल्हा पंचायत यांना मनापासून सहकार्य करण्याचे विनंतीपूर्वक आव्हान केले . संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती गाखरे यांनी पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांचे महत्त्व आणि सहभाग वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याच वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष जयमंगल जाधव यांनी देशपातळीवर 22 राज्यांमध्ये सर्वपक्षीय सदस्यांना एकत्र घेऊन संघटनेची बांधणी करत असल्याचे नमूद केले.लवकरच संघटनेच्या माध्यमातून नॅशनल अवॉर्ड प्रोग्राम घेण्याचे सुतवाच संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी केले . जम्मू काश्मीर मधील जिल्हा परिषदा यांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्राकडे व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे श्री गोरे पाटील यांनी आश्वासन दिले.