
बार्शी : पंढरपूर तालुक्यातील काशसेगाव येथील मातंग समाजाचा युवक महादेव वाघमारे यांच्यावर खोटा 307 चा गुन्हा दाखल करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ठाणे आमदार तपासी अधिकारी यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फकरा व खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या फिर्यादीवर देखील 302 चा गुन्हा दाखल कराअशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून बार्शीत करण्यात आली.मातंग समाजावरील अन्याय आता कधीही सहन केले जाणार नाहीत. मातंग समाज हा सहनशील आहे. या समाजाचा कुणीही अंत पाहता कामा नये .मातंग समाजाने नेहमीच महाराष्ट्राच्या भल्यासाठी शांततेसाठी, संयमाची भूमिका स्वीकारली आहे. संयमाची भूमिका म्हणजे आम्ही शांत आहोत ,असा अर्थ कोणी काढू नये असा स्पष्ट इशारा पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील महादेव वाघमारे यांचा पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता त्याच्या निषेधार्थबार्शीत रास्ता रोकोच्या आंदोलन प्रसंगी आंदोलनाचे संयोजक नवनाथ चांदणे यांनी दिला.
बार्शीच्या एसटी स्टँड परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन सकल बार्शी शहर व तालुका मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं. यावेळी नवनाथ चांदणे उपस्थिता त्यांच्या समोर आपली भूमिका विशद करत होते .
यावेळी बार्शी शहरातील आणि तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या समविचारी संघटनांनी त्यामध्ये आपला सहभाग नोंदवला. अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीधर कांबळे, दलित महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, संदीप आलाट निलेश खुडे संगीतराव शिंदे रमेश शेंडगे पांडुरंग देवकुळे लहुजी शक्ती सेनेचे बालाजी गायकवाड दीपक शिंदे भारतीय लहुजी प्रमुख प्रमिला झोंबाडे प्रशांत काळे, मातंग एकता आंदोलनाचे रवी थोरात, विजय पवार, दास पवार आनंद चांदणे यांच्या सह डेमो क्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या आशिष शिंदे ,अन्याय विरोधी आंदोलनाचे कुणाल खंदारे, ग्रामीण भागातील सरपंच सुरेश कसबे सुधीर लोखंडे यांच्यासह नाथा मोहिते नगरसेवक अमोल चव्हाण ,वैभव काकडे , सर्जेराव रसाळ गुरुजी, अतुल कांबळे पप्पू हनुमंते , सचिन लोंढे भास्कर बगाडे यांच्यासह हजारो मातंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी नवनाथ चांदणे यांनी आपल्या भाषणामध्ये मातंग समाजातील संघटित संघटनांचा कौतुक करत असताना येणाऱ्या काळामध्ये भविष्यात सोलापूर येथे होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी उपस्थित त्यांच्या भावना ऐकून घेतल्या . यावेळी ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि हलग्यांच्या कडकडाट हे आंदोलन सुमारे अडीच तास चालू होते. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये यामुळे काही काळ वाहतुकीचा कोळंबा झाला होता. परंतु तरीही या आंदोलन शांतपणे पार पडल्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री गिरी गोसावी यांनी उपस्थित लोकांचे आभार मानले आणि उपस्थित त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी कालनिर्णय या दिनदर्शिका मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाचा म्हणजेच जयंतीचा उल्लेख नसल्यामुळे कालनिर्णय समूहाचा निषेध करीत काल निर्णय या कॅलेंडरच्या प्रतींची होळी करण्यात आली. यावेळी बार्शी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता